सामाजिक क्षेत्रातील आदर्श प्रेरणादायी आणि सक्षम नेतृत्व म्हणजे
विश्वनाथ आण्णा तोडकर

केज

मराठवाड्यातील दिन दलित पीडित निराधार गरीब शेतकरी कष्टकरी शेतमजूर यांच्या आर्थिक सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी गेली 35 वर्ष अविरत समाजकार्याला वाहून घेऊन लाखो कुटुंबांना खऱ्या अर्थाने अन्याय अत्याचार व जातीयतेच्या विळख्यातून बाहेर काढून त्यांना त्यांचे अधिकार हक्क मिळवून देऊन त्यांना त्यांच्या पायावरती स्वाभिमानाने व सन्मानाने जगण्याचे साधन संसाधन निर्माण करून देऊन समाजात गोरगरिबांना सन्मानाचे स्थान दिलं अशा विश्वनाथ अण्णा तोडकर यांना त्यांच्या 61 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने लाखो जनसमुदायाच्या गोरगरिबांच्या कष्टकऱ्यांच्या व माझ्या वतीने लाख लाख शुभेच्छा. त्यांच्या कार्याचा मी एक शिष्य व पाईक म्हणून त्यांच्या कार्यासोबत गेली तीस वर्षे सतत सावली सारखा असून माझ्यासारखे हजारो कार्यकर्ते सामाजिक क्षेत्रात सक्षमपणे उभे करण्याची क्षमता त्यांच्या अंगी परमेश्वराने निर्माण केली व ती त्यांनी गोरगरिबांच्या कष्टकऱ्यांच्या विकासासाठी अविरत कार्यरत केली
1990 .91 साली मराठवाड्यात अत्यंत दुष्काळ परिस्थितीमध्ये ते पुण्यावरून मराठवाड्यात भोगजी या गावी जाणीव संघटनेच्या माध्यमातून गोरगरीब कष्टकऱ्यांना रोजगार त्यांच्या अधिकार व हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी कामाला सुरुवात केली त्यावेळी मी स्वतः रमेश भिसे मधुकर धस रोहिदास वाघमारे रामभाऊ लगाडे मारुती शिरसाट श्रावण क्षीरसागर महादेव क्षीरसागर सत्वशीला घुले सुनंदा खराटे बप्पा गवारे परमेश्वर गवारे असे असंख्य गोरगरीब कुटुंबातील कार्यकर्ते यांना एकत्र करून अभिरुची वर्ग च्या माध्यमातून समाज प्रबोधन चे कार्य त्यांनी हाती घेतले त्यावेळी महाराष्ट्रभर महाराष्ट्रातील गोरगरीब समाजाच्या अडीअडचणी समस्या जाणून घेण्यासाठी रस्त्यावरती कलापतकाच्या माध्यमातून आम्ही आखा मराठवाडा विदर्भ कोकण पश्चिम महाराष्ट्र पिंजून काढला आणि गरिबांचे जगण्याचे लाखो प्रश्न समोर आले लाखो गरिबांच्या डोळ्यातील अश्रू. सांगत होते की आम्हाला आमचा अधिकार हक्क आणि न्याय द्या त्यासाठी कार्य करा.
यावेळी सर्व कार्यकर्त्यांची मावळ्याची मजबूत सक्षम मोठ. आणानी बांधून गरिबांच्या विकासाचे व जगण्यासाठी चे कार्य करण्याचा निर्णय घेतला व आम्हा सर्वांना आत्मविश्वास व लढण्याची क्षमता त्यांनी आमच्या शेकडो कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केली आणि मग काय मला व रामभाऊला लातूर मधुकर ला विदर्भ रोहिदास व मारुती उस्मानाबाद असे सर्व कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या विभागांमध्ये गावांमध्ये ग्रामीण भागात लोकांना रोजगार पाणी आणि जनावरांना चारा या प्रश्नावरती तसेच रोजगार हमीच्या प्रश्नावरती मराठवाड्यात व विदर्भात झंजावात निर्माण केला आणि लाखो लोकांना रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोजगार मिळवून दिला अनेक धरणे मोर्चे आंदोलन घेराव असा मोठा झंजावात मराठवाडा आणि विदर्भामध्ये अण्णांनी सुरू केला जाणीव चे नाव हा. हा .म्हणता महाराष्ट्रभर झळकू लागले व लोक स्वतःच्या अधिकार व हक्कासाठी रस्त्यावरती उतरू लागले व त्या माध्यमातून लोक जागृती लोक संघटन व सक्षम लोक चळवळ जाणीव संघटनेची निर्माण झाली
अचानक 17 सप्टेंबर 1993 ला मराठवाड्यात लातूर उस्मानाबाद मध्ये भूकंप झाला हजारो लोक मृत्युमुखी पडले भूकंप झाला हे समजताच तातडीने सर्व कार्यकर्त्यांना अण्णांनी एकत्र करून किल्लारी परिसरात
रेबेचिंचोली येथे एक पोत्याचे शेड ठोकून. भूकंपग्रस्तांच्या मदतीला धावलो भूकंपामुळे मातीच्या ढिकाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना काढून त्यांना दवाखान्याच्या सुविधा पुरविणे तसेच लोकांना तातडीने आरोग्य तसेच जगण्याच्या सुविधा निर्माण करून देण्याला सुरुवात झाली वरून पाऊस सगळीकडे धुरळा. आरडा ओरड हा हा कार अक्षरशा कंटाळा बसायच्या त्या लहान मुलांची रडणे त्या िगार्‍याखाली अडकलेल्या मातामावल्या तसेच लोकांचे ओरडणे या किंकाळ्या ऐकून फार अस्वस्थ व्हायचं मात्र लोकांना वाचवायचं आणि वाचलेल्या लोकांना पुन्हा उभा करायचं हे स्वप्न मनाशी बाळगून अण्णांनी सर्व कार्यकर्त्यांना अगदी मुलाप्रमाणे सांभाळून कार्यरत ठेवले त्यामुळे हजारो भूकंपग्रस्तांना वाचवण्यात तसेच पुन्हा उभा करण्यात आम्हाला यश मिळालं
हे करत असताना मी अण्णा सोबत अगदी मुलासारखं आणि लहान भावासारखा सतत सोबत होतो मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं त्यांचं कुटुंब अगदी बिराड पाटीवरती घेऊन या गावावरून त्या गावाला या वेळी खऱ्या अर्थाने त्यांना त्यांची जोडीदार अनिताताई तोडकर या त्यांच्या अर्धांगिनी यांनी त्यांना अगदी त्यांच्या हातात हात घेऊन सक्षमपणे पाठीशी राहिल्या (सावित्रीबाई व महात्मा फुले सारखी जोडी) त्यामुळे त्यांचं योगदान अण्णांच्या यशाच्या पाठीमागचं कधीही विसरता येणार नाही. या धावपळीतच त्यांना तेजश्री मुलगी झाली तीही सततच या सर्वाची साक्षीदार आहे . त्यांनी स्वतःकडे आणि स्वतःच्या कुटुंबाकडे कधीही लक्ष दिले नाही तर सर्व समाज व सर्व कार्यकर्ते हेच आमचं कुटुंब आणि सर्वांचा विकास हेच मुख्य उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आत्मसात करून लढत राहिले
1994 .95 साली भूकंपग्रस्त भागात लोकाना पुन्हा उभं करत असताना अचानक . हे काम करण्यासाठी सहकार्य करत असणाऱ्या वंचित विकास पुणे संस्थेने आम्हाला सर्वांना सहकार्य करण्याच बंद केलं .
तो काळ आम्हा सर्वांसाठी जगण्यासाठी अचानकपणे आमच्यावरती कोसळलेलं फार मोठं संकट होतो कोणाजवळ ही काहीही नाही उत्पन्नाचा जगण्याचं काहीही साधन नाही अशा सर्व परिस्थितीमध्ये अण्णांनी मात्र धीर सोडला नाही काळजी करू नका समाजासाठी काम करत राहू आपणाला स्वतःसाठी काही करायचं नाही आयुष्यामध्ये समाजाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळवून द्यायचं आणि त्यांना पुनः उभं करायचं म्हणून लढतच राहिलो अशावेळी आफॉर्म सारखी संस्था तसेच अनेक छोट्या मोठ्या संस्थानी आम्हाला कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी फक्त जगण्यासाठी का होईना त्यावेळी उभारी दिली कारण अण्णा सर्वांना सोबत घेऊन लाखो कुटुंबांना न्याय देण्याचं काम करत होते हा काळ महाराष्ट्रातील सर्व संस्था संघटना अगदी आश्चर्यकारक रित्या पाहत होत्या.
सर्वांच्या कार्यासाठी एखादा पर्याय उभा केला पाहिजे म्हणून 1995 साली पर्याय संस्थेची स्थापना अण्णांनी ग्रामीण भागातील कष्टकरी शेतकरी शेतमजूर व लोकांच्या हितासाठी स्थापन केली
व नव्या उमेदीने व धाडसाने व हिमतीने अण्णांनी पर्याय च्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन गरिबांच्या अधिकार हक्काच्या लढाईला पुन्हा सुरुवात केली
हे करत असताना मी पाहिलं कारण मी सतत अण्णांच्या सोबत होतो आम्ही दररोज कित्येक किलोमीटर पायी फिरायचो पोटात आगीचा डोंब असायचा खायला काय नसायचं प्रवासाला एक रुपयाही खिशात नसायचा लोकांमध्येच राहायचं लोकांसोबतच खायचं आणि लोकांचे प्रश्न घेऊन लोकांना सोबत घेऊन लढायचं अत्यंत वाईट काळ आमचा 1995 ते 90 च्या काळात गेला मात्र म्हणतात ना की देव तारी त्याला कोण मारी जो समाजासाठी खऱ्या अर्थाने चांगलं कार्य करतो त्याचा भविष्यकाळ उज्वल असतो त्याप्रमाणे अण्णांनी हजारो कार्यकर्त्यांना सोबत घेऊन समाज हिताच कार्य केले त्यामुळे भविष्यात अनेक अडचणी वरती त्यांनी मात करून यशस्वीरित्या समाजाला न्याय आणि अधिकार हक्क मिळवण्याचा लढा चालूच ठेवला नंतर दलित भूमी शेतमजुरांना ते कसंत असलेली जमीन मिळाली पाहिजे म्हणून जमीन अधिकार आंदोलनाच्या माध्यमातून विविध सामाजिक संस्था संघटनांना सोबत घेऊन मराठवाड्यातील 500 गावातील लाखो दलित भूमीनाना जमिनीचा अधिकार व जगण्याचा अधिकार मिळवून दिला हे करत असतानाच मराठवाडा लोकविकास मंचची मंगलाताई दैठणकर यांच्या प्रेरणेतून व अण्णांच्या नेतृत्वातून मराठवाड्यात सुरुवात झाली व मराठवाड्यातील ग्रामीण भागात कार्यरत असणारे सामाजिक क्षेत्रातील लढाऊ कार्यकर्ते छोट्या मोठ्या संस्था संघटना यांना सोबत घेऊन त्यांची क्षमता बांधून मराठवाड्यातील हजारो गावातील लोकांना रोजगार पाणी जनावरांना चारा तसेच भूमीहिनशेतमजूर शेतकरी कष्टकरी यांच्या प्रश्नावर ती काम करण्यासाठी हजारो संस्था संघटना निर्माण केल्या व त्यांच्या माध्यमातून एक झंजावात मराठवाड्यात अण्णांनी सुरू केला
अण्णा म्हणजे परिवर्तनवादी विचारसरणीतील आदर्श व्यक्तिमत्व आणि अण्णा म्हणजे एक विकासाचा विचार विश्वास ही भावना सर्व संस्था संघटना कार्यकर्ते व समाजाच्या मध्ये सक्षम रुजली असून ती ताकतीनिशी पुढे जात आहे
पुढे कोविडचा काळ आला कोविडच्या काळात ही अण्णांनी लोकांना जाणीव जागृती तसेच आत्मविश्वास आरोग्याच्या सुविधा त्यामध्ये मास्क सॅनिटायझर हँडवॉश व जगण्यासाठी अन्नधान्य उपलब्ध करून देऊन हजारो कोविडमध्ये अडकलेल्या तसेच समस्याग्रस्त लोकांना समाजाला वाचवण्याचे कार्य कोविड सारख्या महामारीतूनही केलं
आज ही पर्याय च्य
माध्यमातून हजारो लाखो कार्यकर्त्यांना सल्ला मार्गदर्शन मदत तसेच ग्रामीण भागातील गोरगरीब पीडित परित्यकता निराधार महिलांना. मदत करण्याच कार्य ते अविरत करत आहेत माझ्या कारकिर्दीत व कार्यकाळात गेली तीस वर्षात मी त्यांच्या सोबत सावलीसारखा लहान भावासारखा व मुलासारखा सोबत आहे मात्र एक सिंगल ही दोश त्यांच्यामध्ये मला कधी आढळला नाही
सक्षम निस्वार्थी आदर्श प्रेरणादायी व सामाजिक क्षेत्रातील. दिशादर्शक नेतृत्व म्हणजे विश्वनाथ अण्णा तोडकर
1 डिसेंबर हा त्यांचा 61 वा वाढदिवस त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील 61 वर्षाच्या कारकिर्दीतील गौरवाचा व त्यांनी केलेल्या कार्यास सन्मानाचा. व समाजाच्या गोरगरिबांच्या स्वाभिमानाचा अभिमानाचा गौरव दिवस म्हणून आपण सर्वजण साजरे करूयात.
तसेच पुढील आयुष्यात ही त्यांच्या कार्याची भरभराट होऊन लाखो गोरगरिबांना त्यांचा आधार मिळावा व लाखो गोरगरीब कष्टकरी शेतमजूर शेतकरी कार्यकर्ते महिला निराधार पीडित यांचा त्यांनी केलेल्या कार्यासाठी त्यांना आशीर्वाद रुपी मिळवून त्यांना उदंड आयुष्य उज्वल भविष्य व निरोगी आयुष्य लाभो त्यांची पुढील शंभरी आपल्या सर्वांच्या साक्षीने व डोळ्यांनी पाहण्याची ईश्वराने आम्हा सर्वांना शक्ती देवो.
हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना
आपलाच
रमेश भिसे

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *